Jun 16

१. पृथ्वी :: सहिष्णुता आणि सहनशीलता

:: दत्तरूपी अवधूताचे २४ गुरु :: 

 

1.Guru::Earth

 पंचमहाभूतांपैकी एक पृथ्वी. पृथ्वी कडून अवधुतांना सहिष्णुता आणि सहनशीलता हे गुण शिकायला मिळाले. पृथ्वीवरील सर्व जीव तिच्यावर ह्या न त्या मार्गाने आघात करीत असतात. कधी तिला नागरून, कधी खणून, कधी पोखरून तर कधी मलविसर्जन करून परंतु पृथ्वी समान भावाने आणि आपल्या सहनशील गुणाने सर्वांना तिच्या काळजातून पिक देते ज्यामुळे सर्व मानवसृष्टी आपले उदरभरण करते. पृथ्वी ठाई सर्वांना जागवण्याची शक्ती आहे. ती सर्वांना नुसते पिकाचं नव्हे परंतु अनेक रत्ने, खनिजे सुद्धा देते आणि ते देखील निरपेक्ष भावनेने.

 

1.Guru::Earth| Tree१.१. वृक्ष ( उपगुरु ) :: परोपकार

वृक्षाचा परोपकार हा गुण अवधूतांनी ग्रहण केला. वृक्ष निरपेक्ष मनाने, सर्व प्राणीमात्रांना छाया देतो, पक्ष्यांना निवासाचे स्थान देतो, सर्वांना गोड फळे देतो. कुठलाही दुजाभाव वृक्षाठाई नाही. आपण त्याला दगड मारला तरी वृक्ष त्याच्या परोपकारी वृत्तीला कधीच सोडत नाही. वृक्षाच्या पानांचा, फुलांचा, फळांचा, खोडाचा सर्वतोपरी उपयोगच होतो. अनेक छोटे - मोठे जीव वृक्षावर अवलंबून असतात परंतु त्याने त्याचा सार्थ अभिमान न बाळगता ते आपल्या सेवेस सदैव रुजू असते.

 

1.Guru::Earth| Mountains१.२. पर्वत ( उपगुरु ) :: संपादन आणि संचय

पर्वत आपल्या उदरामध्ये अनेक खनिजे, रत्ने ह्याचे संपादन करून संचय करून ठेवते. आणि मानवास त्याचा उपभोग घेता येतो. इतकेच नव्हे तर ते पाण्यासारखा मुलभूत रत्नाचाही, पर्वत स्वतःमध्ये संचय करते. परंतु वेळ आली कि हे सर्व मानवालाच अर्पण असते. तसेच मानवांनी ज्ञान संपादन करून त्याचा संचय करावा आणि इतरांना त्याचा लाभ निरपेक्ष मनाने व बुद्धीने उपभोगू द्यावा.

श्री गुरुदेव दत्त...!!!

 

 

 

Jun 16

दत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध (भाग २)

:: कथा ययातिची  ::

 

पांडवांचा पूर्वज राजा नहूषाचा पुत्र 'ययाति'. एक असा राजा ज्याने भौतिक सुखासाठी बरेच काही गमावले. सर्व काही असून ययातिच्या वाटेला आत्मिक सुख आले नाही.

 

24 Gurus

ब्राम्हणकन्या देवयानी आणि दैत्यराज वृषपर्व ह्याची कन्या शर्मिष्ठा ह्या दोघीही सोबतच लहानाच्या मोठ्या झाल्या. शर्मिष्ठाला तिच्या राजकन्या होण्याचा गर्व आणि देवयानीला दैत्यांच्या गुरुकन्या असण्याचा गर्व. दोघीही सोबत जरी वाढल्या असल्या तरी दोघींचा अहं तसाच शाबूत होता. दोघीही एकमेकींना कमीपणा दखवायची संधी सोडत नसे. एक दिवशी जलक्रीडा करत असताना देवयानी आणि शर्मिष्ठा ह्या दोघींचे भांडण झाले. अश्यात देवयानीचा पाय घसरला आणि ती विहिरीमध्ये पडली. ते पाहून शर्मिष्ठापण घाबरली आणि वेगे घरी गेली परंतु देवयानीचा समज झाला कि शर्मिष्ठा तिला ढकलून घरी निघून गेली. योगायोगाने ययाति त्या विहिरीजवळून जात होता आणि त्याने देवयानीचा आवाज ऐकला आणि त्यानी तिचे प्राण वाचवले. आपले अर्धे वस्त्र देवयानीस दिले. देवयानीने तिथेच त्याचा पती म्हणून स्वीकार केला होता. कारण एका परपुरुषानि तिचा जीव तर वाचवलाच होता परंतु तिला वस्त्र देऊन तिच्या शीलाचे रक्षण केले होते. ययातिहि ह्या लग्नाला तयार झाला. त्याप्रमाणे ययाति आणि देवयानी यांचा विवाह झाला. परंतु देवयानी शर्मिष्ठाला विसरली नव्हती. शुक्राचार्यांच्या कोपातून वाचण्याकरिता आणि राज्याकरिता शर्मिष्ठाला राजकन्या असून आजन्म देवयानीचे दासित्व पत्करावे लागले.

 

24 Gurus

पुढे खूप काळ लोटला. देवयानीला आणि ययातिला यदु, तुर्वासू हे दोन पुत्र झाले. दरम्यान राजकन्येची दासी झालेली शर्मिष्ठा आणि ययाति हे देखील एकमेकांच्या जवळ आले होते. परंतु दासी असल्या कारणानी तिच्याशी विवाह करणे ययातिस अशक्य होते. परंतु पुढे शर्मिष्ठाला आणि ययातिला दृहयु, अनु आणि पुरू असे तिघा पुत्र झाले. शर्मिष्ठाने ययातिला एकांतामध्ये तिचे पत्नीत्व जाहीर करण्याचा प्रस्ताव पुढे ठेवला आणि ययातिने ते मान्य केले. हे ऐकून देवयानी संतापली आणि आपल्या वडिलांच्या कानावर हि हकीकत घालताच शुक्राचार्य कोपले आणि ययातिला शाप दिला, 'भोगवासेनेच्या आहारी जाऊन तू दासीचा स्वीकार केलास, तुला भौतिक सुखात अधिक रस होता. पण हे सगळ तू केलास ते तुझ्या यौवनाच्या जोरावर. मग मी तुला शाप देतो, तुझे यौवन लुप्त होऊन तू तत्काळ वार्धक्य प्राप्त करशील.' मात्र हा शाप ऐकून देवयानीच्या पायाखालची जमील हलली. आपल्याच वडिलांनी आपल्याच पतीला असा शाप दिला तेव्हा तिने पुन्हा शुक्राचार्यांना याचना केली कि ह्यासाठी काहीतरी उःशाप द्यावा. तेव्हा शुक्राचार्यांनी सांगितले ह्या शापाला एकाच उःशाप, ययातिचे तारुण्य त्याला परत मिळवायचे असेल तर त्याने एका अश्या तरुणाला याचना करावी जो त्याचे तारुण्य ययातिला देऊन ययातिचे वार्धक्य पत्करेल परंतु तो तरुण ययातिच्या रक्ताचा असावा. जगण्याची, भोगाची, वासनेची लालसा ययातिला इतकी होती कि त्यानी आपल्या पाचही पुत्रांना त्यांच्या यौवनाची याचना केली. आपल्या पुत्रांच्या जिवापेक्षा स्वतःच्या शारीरिक सुखाची भूक मोठी वाटली. त्यात दासी शर्मिष्ठाचा लहान पुत्र पुरू वडिलांच्यासाठी हा शाप स्वतः पत्करायला तयार झाला. पुरुवर प्रसन्न होऊन ययातिनी त्याला सिहासनाधीश बनवले आणि यदु आणि इतर चार पुत्रांना शाप दिला, ' तुम्हाला किंवा तुमच्या वंशजांना छत्र आणि सिंहासन प्राप्त होणार नाही.' हे ऐकून यदु अतिशय कष्टी झाला. आणि मनात अनेक प्रश्न, शंकांचे पोळे घेऊन यदु जंगलात निघून गेला.

श्री गुरुदेव दत्त...!!!

Jun 16

दत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध

24 Gurusमहान परंतु अतिशय शीघ्रकोपी ऋषी शुक्राचार्य ह्यांनी देव आणि असुर ह्यांमधून असुरांचे गुरुत्व पत्करले आणि देव-दानव युद्धामध्ये असुरांना सर्वोतोपरी जाणीवपूर्वक सहाय्य केले. शुक्राचार्य ह्यांना संजीवनी-मंत्र-सिद्धी अवगत होती. संजीवनी मंत्रोचाराने त्यांनी युद्धामध्ये मृत पावलेल्या अनेक असुरांना पुनोर्जीवन बहाल केले. अश्या कुटनीतीमूळे देवांना असुरांवर विजय तर दूरच पण नियंत्रण मिळवणे अवघड झाले. ह्याच करिता देवगुरु बृहस्पती ह्यांनी आपला पुत्र कच ह्याला शुक्राचार्यांचे शिष्यत्व पत्करायला सांगितले. त्या ज्ञेप्रमाणे कचने शुक्राचार्यांची भरपूर मनोभावे सेवा करून मन जिंकले. मात्र असुरांना कच आणि देवांचे हे कपट लक्षात आल्याने कचला ठार मारले. शुक्राचार्यांचे कन्यारत्न म्हणजेच गुरुकन्या देवयानी हिचा कच वर जीव जडला होता. त्यामुळे तिनी आपल्या वडिलांकडे हट्ट करून कचला संजीवनी मंत्रोच्चाराने पुनोर्जीवन दिले. परंतु असुरांनी त्याला पुन्हा ठार केले. शेवटी मात्र असुरांनी तिला पुन्हा जिवंत करता येऊ नये याकरिता कच ला जाळून त्याच्या राखेत मध टाकून तयार केलेले पेय असुरऋषी शुक्राचार्यांना पाजले. परंतु देवयानीच्या आग्रहाखातर स्वतःचा जीव धोक्यात घालून नव्हे तर जीव देऊन शुक्राचार्यांनी कचला जिवंत केले आणि स्वतः मृत्युच्या कवेत गेले. ते पाहून देवयानीने संजीवनीचा मंत्र घोष करून आपल्या पित्याला पुनश्च जिवंत केले. परंतु तोच मंत्र कचने ३ वेळा ऐकून संजीवनी मंत्र आत्मसाद केला.

24 Gurusआपल्याला सोपवलेला कार्यभार संपवून कच ने शुक्राचार्यांना परत जाण्याची आज्ञा मागितली. तेव्हा गुरुकन्या देवयानीने विवाहाचा प्रस्ताव कच समोर मांडला. परंतु कचने तिला सांगितले कि, "माझे पुनर्जीवन शुक्राचार्यांच्या उदरातून झाल्यामुळे तू माझी बहीण लागतेस आणि तू माझ्या प्राणांचे रक्षण केले आहेस तेव्हा तू माझ्या माते समान आहेस. धर्माच्या विरुद्ध जाऊन हा विवाह संपन्न होणे नाही.” हे कचाचे बोल ऐकून देवयानीने त्याला घोर शाप दिला कि, "तू शिकलेली मंत्रसिद्धी विसरून जाशील.” देवयानीच्या अश्या वागण्याला संतापून कचाने देखील तिला शाप दिला कि, "तूझा विवाह ब्राम्हणेतर कुळात होईल.”आणि त्याप्रमाणे पुढे देवयानीचा विवाह ययाती नावाच्या राजशी झाला.

श्री गुरुदेव दत्त...!!!

Jun 15

श्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सातवा

52 shloki gurucharitra :: Adhyay 7

श्री गुरुदेव दत्त ...!!!

Jun 14

श्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सहावा

52 shloki gurucharitra :: Adhyay 6

श्री गुरुदेव दत्त ...!!!

◄ Older PostsNewer Posts ►
Start Jap Online