Jun 17

२०. कुमारी आणि कंकण:: एकाकीपणा साधनेस योग्य

20.Guru :: Maiden

कोण्या एका कुमारिकेला घरात राखण करायला ठेऊन तिचे आई-वडील कुलस्वामिनीच्या यात्रेला जातात. त्यावेळी अचानक त्या कुमारिकेचा विवाह ज्या घरात ठरला आहे त्या घरातली मंडळी घरी येतात. घरात कोणी नाही परंतु त्यांचा आदरसत्कार करायला हवा ह्या विचारात ती कुमारिका काहीही न बोलता त्यांच्या आदर सत्काराच्या तयारीला लागते.  घरामध्ये तांदूळ सडलेले नाहीत हे पाहून कुमारिका लगेच तांदूळ सडू लागते परंतु तिच्या कंकणाचा आवाज होऊ लागते. पूर्वीच्या काळी रिवाज असे कि स्त्रियांच्या ककणांचा आवाज होणे बरे नाही, त्यावरून त्या मुलीची अथवा स्त्रीची स्वभाव परीक्षा होत असेल. तेव्हा आपल्या ककणांचा आवाज झाला तर वर पक्षाला वाटेल कि मुलगी दांगट आहे म्हणून त्या कुमारीकेनी आपल्या हातामाध्ले दोन कंकण काढून ठेवले आणि पुन्हा तांदूळ सडू लागली पण तरीहि आवाज होताच होता. त्या कुमारिकेने हातामध्ये एक-एक कंकण ठेऊन आपले काम सुरु केले. ह्यावरून योगी पुरुषाने असे लक्षात घ्यावे कि अनेकजण जिथे एकत्र होतात तिथे कोलाहल होतो आणि दोन जणांमध्ये संवाद. कोणताही गट बनवून राहण्यापेक्षा योगी पुरुषाने साधनेसाठी एकाकीपणा आचरावा.

श्री गुरुदेव दत्त...!!!

 

Jun 17

१९. बालक :: कुतुहूल आणि निरागसता

19.Guru :: Playfull Boy

लहान मुलांना देवाचे दूत म्हणतात ते काही खोटं नाही. लहान मुल कोणताही भेदभाव न बाळगता सगळ्यांचा त्वरित स्वीकार करतात. त्याला आपले विश्वच इतके प्रिय असते कि त्याला राग, लोभ, मद, मत्सर, चिंता, त्रागा ह्या गोष्टींची भ्रांतच नसते. मान-अपमान ह्या गोष्टी लहान बालकास शिवत नाहीत. कुतुहूल आणि निरागसता हे गुण बालकाला निसर्गातच देणगी म्हणून मिळतात. कोणी लाडाने खेळवले अथवा कोणी रागाने झिडकारले तरी त्याला त्याचे दुखः होत नाही कि अति आनंदात ते मुल रममाण होत नाही. योग्यांनी हा बालकाचा गुण अंगी बाळगावा. निरागस आणि सरळ वृत्ती ठेवावी. कोणत्याही गोष्टीसाठी राग मानू नये किंवा आनंदात बुडून जाऊन परमात्म्याला विसरू नये.

श्री गुरुदेव दत्त...!!!

 

Jun 17

१८. टिटवी :: लोभाचा त्याग

18.Guru :: Moth

टिटवी म्हणजे शिकारी पक्षी. एकदा एका जंगलात अनेक टिटवे पक्षी होते. त्यांच्यातल्याच एका टिटव्यानी एक मोठा मांसाचा गोळा शोधून आणला परंतु जसा त्या सर्व टिटव्यांना त्या मांसाचा वास लागला तसे ते सगळे तिथे गोळा झाले. आणि त्यांनी त्या टिटव्याला चोची मारायला सुरवात केली. असंख्य वेदना होत असूनही तो टिटवा ओरडू शकत नव्हता, कारण तो ओरडला तर मांसाचा गोळा चोचीतून खाली पडेल. पण तो मांसाचा गोळा मिळत नाहीये हे पाहून त्या इतर टिटव्यांनी त्याला पंखांनी फडाफड मारायला सुरुवात केली. आता मात्र वेदना असह्य होऊन त्याने चोच उघडली आणि तो मांसाचा गोळा खाली पडला. तसे ते सगळे टिटवे तिथे जमा झाले आणि त्या एका गोळ्यासाठी भांडू लागले. ह्यावरून योग्यांनी हे लक्षात घ्यावे त्या टिटव्याने त्याला होणारी वेदना दूर करायला त्याला झालेला त्या मांसाच्या गोळ्याचा त्याग केला म्हणजेच लोभाचा त्याग करणे म्हणजेच वेदनेपासून मुक्तता.

श्री गुरुदेव दत्त...!!!

 

Jun 17

१७. पिंगला वेश्या:: आत्मजागृती आणि परीवर्तन

17.Guru :: Pingla

पिंगला म्हणजेच एक वेश्या, जी आपले शरीर, द्रव्यासाठी विकते आणि कामसुखात लुब्ध राहते. अश्या स्वैराचारीणीला श्री दत्तगुरूंनी कसे काय गुरु बनवले? तर त्याचे कारण,आत्मजागृती आणि परीवर्तन. वेश्या जी धनामागे, वासेनेमागे सर्व श्रुंगार करणारी एक स्त्री, जीची सावली देखील अपवित्र वाटावी. जी पुरुषाला आपल्या शारीरिक सुंदर्यावर नादी लावणारी, हि वारांगना. जि सर्व सुख भोगून देखील ती जणू अतृप्त होती. अनेक दिवस आपल्या मादक सौंदर्याचा व्यर्थ गर्व बाळगून जिने धनाचा मोठा संचय केला. परंतु काळ कोणासाठी थांबत नाही तसा तो तिच्या साठी देखील थांबला नाही. जसे दिवस सरले त्या दिवसांसोबत वेश्येच तारुण्य हि सरले आणि कोणीही तिच्याकडे बघेनसा झाले. तिचे सौंदर्य आता काहीच कामाचे नव्हते हे तिला सुधा कळून चुकले परंतु एक वेडी आस लाऊन ती रोज नटून दारात उभी असे, पण तिला बघणार कोण. अश्या परिस्थितीत तिला तिच्या चुकांची जाणीव झाली. ज्या गोष्टींना तिने अनन्य महत्व दिले ते फोले होते हे तिला कळून चुकले. आणि ती परमात्म्याला शरण आली. श्रीहरींनी तिचा उद्धार केला. तिला झालेल्या आत्मजागृतीने आणि तिच्या मधील झालेल्या परीवर्तनामुळेच तिला गुरु बनवले. योग्यांनी देखील भौतिक सुखाचा वाली बनू नये. आपल्याकडे असलेले तारुण्य हे चिरकाल नाही हे लक्षात घ्यावे. शरीराचे चोचले पुरवण्यापेक्षा आत्मा आणि विवेक ह्यांना जागृत ठेवावे हीच शिकवण ह्या उदाहरणातून शिकायला मिळते.

श्री गुरुदेव दत्त...!!!

Jun 17

१६. मासा :: ओढ, आसक्ती

16.Guru :: Fish

मासा पाण्यात राहणारा एक जीव. परंतु त्या माश्याला पाण्याची इतकी ओढ, इतकी आस असते कि तो पाण्यावाचून एक क्षण जिवंत राहू शकत नाही. त्याची पाण्याशी असलेली आसक्ती, ओढ हि परमोच्च असते. माश्याला पाण्याहून विलग करता येत नाही. त्याप्रमाणे भगवंताविषयी योगी पुरुषाला तितकीच ओढ असावी. भगवंताच्या नामस्मरणाने योग्याचे प्रत्येक क्षण व्यातीती व्हावेत. भगवंत आणि भक्त एकरूप झाले पाहिजेत कि भगवंतापासून भक्ताला विलग करणे म्हणजे शरीरापासून आत्म्याला विलग करणे.

माश्याचा अजून एक गुणधर्म म्हणजे रसनेची तृप्ती होण्यासाठी गळाला अडकवलेले अन्न मासा ग्रहण करायला जातो आणि आपला मृत्यू ओढवून घेतो त्याप्रमाणे योग्याने त्याच्या जिव्हेच्या स्वादास अति महत्व देणे व्यर्थ आहे.योग्याने परमात्म्यावर विश्वास ठेऊन मिळालेली भिक्षाच संपूर्ण मानवी.

श्री गुरुदेव दत्त...!!!

◄ Older PostsNewer Posts ►
Start Jap Online